‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र एआय’ धोरण

राज्यातील उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र एआय धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले.‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या धोरणाच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि जबाबदार प्रशासन यांना चालना देण्यात येणार आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे, त्यामुळे या धोरणात काळानुरूप बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री […]
शेतीसह डेअरी व्यवसायाला संरक्षण

भारत – न्यूझीलंडदरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामध्ये एकीकडे भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करताना दुसरीकडे निर्यातीस मोठ्या संधी उपलब्ध कपून देण्यात आल्या आहेत. या करारानुसार भारताच्या शेती व डेअरी क्षेत्राला संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, न्यूझीलंडमधील शेतकऱ्यांना भारताच्या बाजारपेठेत मर्यादित आणि नियंत्रित प्रवेश देण्यात आला आहे. सफरचंद, किवी फळ, मनुका, मध आणि अल्ब्युमिन्स यांसारख्या निवडक उत्पादनांनाच […]
द्राक्ष बागेत संरक्षणासाठी पाचटाचा वापर

वाढलेल्या तापमानापासून द्राक्ष बागेचे संरक्षण आणि पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करून पाणी बचतीसाठी द्राक्ष बागेत मल्चिंगसाठी उसाच्या टाकाऊ पाचटाचा उपयोग जुन्नर तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदार करीत आहेत. पाऊस पडल्यानंतर कूज होऊन या पाचटाचे कंपोस्ट खत होणार आहे. यामुळे कमी खर्चाची ही नैसर्गिक मल्चिंग बाष्पीभावन वेग नियंत्रण व कंपोस्ट खत अशी शेतकऱ्यांना बहुउद्देशीय लाभ देणारी आहे. […]
युद्धजन्य परिस्थितीतही आंबा निर्यात सुरू

अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या परिस्थितीतही राज्यातील आंबा निर्यातीला सुरुवात झाली आहे. राज्य पणन मंडळाच्या विविध निर्यात सुविधा केंद्रांमार्फत अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आतापर्यंत २७२ टन आंब्याची निर्यात झाली आहे. चालू हंगामात सुमारे २,५०० टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी […]
द्राक्ष पट्ट्यात ‘खरड’ छाटणी वेगात

नाशिक, निफाड, दिंडोरी, चांदवड व येवला तालुक्यांत सध्या एप्रिलमधील ‘खरड’ छाटणीला वेग आला आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून ही कामे वेळेत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.उन्हाचा पारा वाढत असल्याने नवीन फुटीच्या संरक्षणासाठी नियोजन केले जात आहे. एकूणच, नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट व खर्चात वाढ होऊन शेतीचे अर्थकारण विस्कळीत झाले असले, तरी दर्जेदार उत्पादनाला मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या […]
वेळेआधी ‘एल निनो’ची चाहूल

जागतिक हवामानासह पर्जन्यमानावर प्रभाव पाडणारा ‘एल निनो’ वेळेच्या आधीच येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागासह जगभरातील सर्व प्रमुख हवामान संस्थांच्या निरीक्षणांनुसार प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात सतत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत एल निनो येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा एल निनो येण्याची शक्यता पूर्वीच […]
जमीन ‘एनए’ होईल एका क्लिकवर, थेट ७/१२ उताऱ्यावर नोंद, कशी आहे प्रक्रिया?

अकृषिक (NA) म्हणजेच एनए परवानगीची अट काढून टाकल्यानंतर विकासकाला परवानगी आणि त्यासाठीचे अधिमूल्य भरण्यासाठी इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) राज्य सरकारने सुरू केली आहे. याबाबतची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. २२ एप्रिल) दिली. मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, ‘एनए’ची अट आपण रद्द केली. पण याची प्रणाली विकसित करायची होती. आता कोणत्याही व्यक्तीला […]
सिंचन वाढणार, कर्ज सुविधा उपलब्ध होणार, राज्यातील ९ जिल्ह्यांत पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यास मान्यता

राज्यातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या ९ जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्याही गठित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्यव्यवसाय विभागाने जारी केला आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात […]
शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीसाठी ३० जून तारीख दिली आहे. पण ३० जूनपर्यंत थांबण्याची गरज नाही. त्याच्याअगोदरच २ लाखांपर्यंत कर्जमाफी होईल, असे कृषिमंत्री भरणे यांनी सोमवारी (दि. २० एप्रिल) सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांची ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी होईल, अशी घोषणा याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण त्याआधीच […]
फळनिर्यात दहापट वाढण्याचा अंदाज

भारताच्या फळनिर्यातीचे मूल्य २०४७-४८ पर्यंत तब्बल ९ लाख ५६ हजार ५२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या हे मूल्य १ लाख २ हजार ७५० कोटी रुपये इतके आहे. म्हणजेच पुढील वीस वर्षांत देशाच्या फळनिर्यातीत दहा पट वाढ होईल, असा अंदाज नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेसच्या (एनएएएस) नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात वर्तविण्यात आला […]