पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, पशुधनाच्या देखभालीसाठी मिळणार कर्ज, व्याज परताव्यात मोठी सवलत

कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी व्याज सवलतीसह कर्ज दिले जाईल. https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

पुण्याला आणखी एक महामार्ग मिळणार! ‘नेरळ-शिरूर महामार्गा’ला सरकारची मान्यता; मुंबई-अहिल्यानगर थेट प्रवास शक्य

पुणे-मुंबई दरम्यानची भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नेरळवरून थेट नाशिक आणि अहिल्यानगर मार्गला जोडणाऱ्या नेरळ-शिरूर या चारपदरी महामार्गाच्या बांधकामाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातून आणखी एका नवा महामार्ग तयार होणार असून, मुंबईहून थेट अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी एक नवा पर्यायी मार्ग तयार होणार आहे. १२०० कोटींचा प्रकल्प राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने […]

दहावीच्या निकालात १७९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण; जाणून घ्या तुमच्या विभागातील टॉपर्सची संख्या

महाराष्ट्र १०वीच्या निकालात यंदा लातूर पॅटर्नचा डंका वाजला आहे! राज्यात एकूण १७९ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले असून, एकट्या लातूर विभागातील १०४ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकालासह बाजी मारली असली, तरी १०० टक्के गुण मिळवण्यात लातूर आघाडीवर आहे. मुलींनी मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी सरस कामगिरी केली आहे. वाचा, तुमच्या विभागात किती विद्यार्थ्यांनी मारली […]

विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यातील काही भागात पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील उन्हाचा चटका कायम असतानाच काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या सरींची सुरवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे. https://agrowon.esakal.com/agro-special/ethanol-petrol-e25-blending-india-policy-2025-abhi47

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची राज्यात अंमलबजावणी, १५१ कोटींचा कृती आराखडा मंजूर

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान राज्यात २०२६-२७ मध्ये राबविण्यासाठी १५१ कोटी रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्यात हे अभियान राबविण्यासाठी केंद्राचा हिस्सा (६०%) ८८ कोटी ३७ लाख ८९ हजार व राज्याचा हिस्सा (४०%) ५८ कोटी ९१ लाख ९३ हजार रुपये इतका आहे. तसेच प्रशिक्षण घटकासाठी १०० टक्के केंद्रीय सहाय्य ३ कोटी ८६ […]

महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशनला सुरुवात

‘महा ड्रोन यात्रे’ दरम्यान राज्यभरातील १०० तरुणांना कृषी ड्रोनचे वितरण‘महाराष्ट्र कृषी ड्रोन क्रांती मिशन’ अंतर्गत १०० कृषी ड्रोन वितरण उपक्रमाची सुरुवात १ मे रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथील डॉ.शिरनामे सभागृहात करण्यात आली.यावेळी राज्यव्यापी ‘महा ड्रोन यात्रे’ ला यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.या कार्यक्रमाला माजी ब्रिगेडिअर विरेश श्रीवास्तव, माजी सनदी […]

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २५ टक्के होण्याची शक्यता

 केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२५ पासून ऊसरस, सिरप, बी-हेवी मळी आणि सी-हेवी मळी या सर्व ऊसाधारित कच्च्या मालाचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी पूर्णतः खुला केला आहे. तसेच राज्य विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोलमध्ये २५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे (ई-२५) धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) वार्षिक साखर अहवालात नमूद करण्यात आले आहे. उसाच्या उपलब्धतेच्या टंचाईमुळे यापूर्वी लागू […]

शून्य मशागत खरंच फायदेशीर ठरते का?

मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि शेतीमध्ये खर्च कमी करण्यासाठी शून्य मशागत पद्धत ओळखली जाते. मात्र ही पद्धत जमीन आणि पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे शून्य मशागत फायदेशीर असली तरी करताना जमिनीचा प्रकार आणि पिकांची निवड यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. शून्य मशागतीचे फायदे शून्य मशागतीमुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. मातीची रचना सुधारते आणि ओलावा टिकून राहतो. नत्र, स्फुरद, […]

‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर ‘महाराष्ट्र एआय’ धोरण

राज्यातील उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र एआय धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले.‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर राबविण्यात येणाऱ्या या धोरणाच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि जबाबदार प्रशासन यांना चालना देण्यात येणार आहे.   आगामी काळात ‘एआय’मुळे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे, त्यामुळे या धोरणात काळानुरूप बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री  […]

शेतीसह डेअरी व्यवसायाला संरक्षण

भारत – न्यूझीलंडदरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामध्ये एकीकडे भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचे संरक्षण करताना दुसरीकडे निर्यातीस मोठ्या संधी उपलब्ध कपून देण्यात आल्या आहेत. या करारानुसार भारताच्या शेती व डेअरी क्षेत्राला संरक्षण देण्यात आले आहे. तसेच, न्यूझीलंडमधील शेतकऱ्यांना भारताच्या बाजारपेठेत मर्यादित आणि नियंत्रित प्रवेश देण्यात आला आहे. सफरचंद, किवी फळ, मनुका, मध आणि अल्ब्युमिन्स यांसारख्या निवडक उत्पादनांनाच […]