काढणीपश्चात सुविधायुक्त क्लस्टर्स उभारणार: मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मॅग्नेट-२.० (महाराष्ट्र ॲग्रिबिझनेस नेटवर्क) प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच काढणीपश्चात सुविधांनी सुसज्ज मेगा क्लस्टर्स उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मॅग्नेट-२.० प्रकल्पासाठी मॅपिंग स्टडी आणि संपूर्ण प्रकल्प आराखडा अंतिम करण्यासंदर्भात नुकतीच रावल यांच्या […]

कांदा खरेदीचा सावळागोंधळ!

नाफेडद्वारे कांदा खरेदी म्हणजे आतापर्यंत त्यात प्रचंड गोंधळ, गौडबंगाल, गोपनीयता आणि गैरप्रकार असे समीकरण ठरले होते. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी शेतकऱ्यांना त्रासदायकच वाटत होती. आता या समीकरणांमध्ये शेतकऱ्यांचा थेट छळही समाविष्ट झाला आहे. कांदा खरेदीसाठीच्या अत्यंत जाचक अटी तसेच नाफेडचे प्रतिनिधी, वखार महामंडळाचे अधिकारी – कर्मचारी यांच्या संथ आणि आडमुठ्या कारभाराने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक […]

‘एल निनो’ आतापर्यंतचा सर्वांत तीव्र ठरण्याची शक्यता

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस, पूर आणि तापमानातील चढ-उतार या घटना वाढण्याची शक्यता आहे. तर यंदाचा ‘एल निनो’ आतापर्यंतचा सर्वांत तीव्र ठरू शकतो, अशी शक्यताही ‘युरोपियन सेंटर फाॅर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट’ या संस्थेने व्यक्त केली आहे. ‘एल निनो’चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याच्या […]

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ, पेट्रोल स्वस्त होणार?

केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण अधिक असलेल्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील उत्पादक शुल्क माफ केले आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने एक अधिसूचना जारी […]

हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

मागील काही वर्षांपासून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. पावसाळा कधी लवकर तर कधी उशिराने सुरू होणे, त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, कमी वेळात अधिक पाऊस, दोन पावसांत मोठे खंड पडताहेत. हिवाळा हा ऋतू तर जवळपास गायबच झाल्यात जमा आहे. उशिराने म्हणजे जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये थोड्या कालावधीसाठी तीव्र थंडीच्या […]

‘हवामान-लवचिक’ शेती गरजेची

हवामानातील वाढती अनिश्चितता, टोकाचे हवामान आणि ‘एल निनो’च्या सावटाखाली भारतीय शेतीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘हवामान-लवचिक’ (क्लायमेट रेझिलिएंट) शेती पद्धतींकडे तातडीने वळणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या करण्यापेक्षा ‘एल निनो-सज्ज’ शेती हीच राष्ट्रीय प्राथमिकता असायला हवी, असा इशारा ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फार्मर असोसिएशन’ने (फायफा) नुकत्याच नवी दिल्ली येथे प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे. जागतिक पर्यावरण […]

कांदा खरेदी आजपासून सुरू

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत रखडलेली कांदा खरेदी अखेर सोमवार (ता. ८)पासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष सुरू होत आहे. शेतकरी व शेतकरी संघटनांच्या मागणीला यश आले असून पाच वर्षांनंतर ही खरेदी बाजार समित्यांमध्ये होत आहे. ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सींच्या माध्यमातून ही खरेदी केली जाईल. ही खरेदी लिलाव पद्धतीने होणार नसून, […]

‘आरबीआय’कडून रेपोदर ‘जैसे थे’

पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि मॉन्सूनवर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपोदरात कोणताही बदल न करता तो ५.२५ टक्के इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी (ता. ५) जाहीर केले. या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा हप्ता वाढणार नसून तो स्थिर राहणार आहे. […]

‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

कोल्हापूर जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद असलेल्या सुमारे ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी अद्याप प्रलंबित असून, या सर्व नोंदी येत्या १५ दिवसांत मोहीम स्वरूपात पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. यापुढे कोणत्याही कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य राहणार आहे. तसेच शासनाच्या नियोजित […]

शेतात येतंय ‘लेझर विडिंग’ तंत्रज्ञान

लेझर विडिंग यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तसेच हाय-स्पीड कॅमेरे बसवलेले असतात. त्याच्या माध्यमातून तणाची ओळख पटवून त्यावर लेझरचा मारा केला जातो. त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. सध्या पाश्चिमात्य देशात मका, कपाशी, सोयाबीन आणि प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये या तंत्रज्ञानांचा वापर सुरू झाला आहे. तसेच सेंद्रिय शेतीमध्ये रसायनांना पूर्ण बंदी असते, तिथे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी […]