द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित द्राक्ष व्यापाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी द्राक्ष बागायत दार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याकडे केली.
याबाबत दिलेल्या निवेदनात ते म्हंटले आहे, कि गेल्या तीन वर्षाच्या हंगामामध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी व येत्या द्राक्ष हंगामामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. याकरिता द्राक्ष माल खरेदीसाठी येणाऱ्या व्यापारी यांची सर्व माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत गोळा करून त्याची एनओसी तयार करून पोलीस स्टेशनला पाठवावी.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा