या संशोधनात शेतकऱ्याला १० गुंठे क्षेत्रावर दोन लाखांचे उत्पादन मिळाले. संशोधनाची ही यशस्वीता पाहता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा नावीन्यता परिषदेने मेळघाटातील ५० शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शी प्रकल्प राबविला. त्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांना पिकाबाबत विश्वास निर्माण झाला. त्यामुळे सहा वर्षांपासून शेतकरी स्वखर्चाने स्ट्रॉबेरी लागवड करीत आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा