Water Scarcity: जल स्वयंपूर्ण गावांचा आराखडा: पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामीण भागात नवीन दिशा
Water Management: तापमानाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतशी ग्रामीण-शहरी भागांतून पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. रब्बी, उन्हाळी तसेच बहुवार्षिक पिकेही अधिक पाण्याची मागणी करीत आहेत. त्याच वेळी विहिरी बोअरवेल मात्र कोरडे पडत आहेत. धरणांतील पाणीपातळीही घटत असल्याने कालवा सिंचनही अडचणीचे ठरत आहे. पुढे उन्हाळा तीव्र होत जाईल आणि पिण्यासाठी आणि पिकांसाठी देखील पाण्याची गरज वाढतच जाणार आहे.