राज्यातील तूर खरेदीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पणन विभागाने तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. १३ मे रोजी ९० दिवसांची मुदत संपत असून १५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे.

राज्यात एक लाख ३७ हजार ४५८ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी झालेली असून, त्यापैकी ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरेदी प्रक्रियेसाठी ९० दिवसांची मुदत १३ मे २०२५ रोजी संपत आहे. उर्वरित नोंदणीकृत शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी होण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेता १३ मे २०२५ पासून पुढे १५ दिवसांची मुदतवाढ केंद्र सरकारने वाढवून द्यावी, अशी विनंती पणन विभागाने केली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सन २०२४ -२५ हंगामात ‘पीपीएस’अंतर्गत २ लाख ९७ हजार ४३० टन तूर खरेदीला मंजुरी दिलेली आहे. त्याकरिता नाफेड व ‘एनसीसीएफ’ या केंद्रीय नोडल संस्थांच्या माध्यमातून राज्यातील आठ राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत ७६४ खरेदी केंद्र राज्यात कार्यान्वित आहेत. त्या खरेदी केंद्रात आतापर्यंत ५२ हजार ९७१ शेतकऱ्यांकडून ७७ हजार ५३ टन तूर खरेदी करण्यात आली आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ७७५० रुपये हमीभावाने तुरीची खरेदी चालू आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/demand-for-15-day-extension-for-tur-procurement-rat16#goog_rewarded

माहिती शेअर करा